शेती व जिवाणू चे काम
नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना पडलेला एक सर्वसाधारण प्रश्न असतो की ही कृषी तंत्रज्ञान सांगते की जमीन तर जिवंत आहे तर उन्हाळ्यात एवढ्या उन्हात जिवाणू जातात कोठे व त्या जीवाणू चे काय होते किंवा मरत का नाही परंतु ते असे होतच नाही. कारण उन्हाळ्यामध्ये जीवाणू हे सुप्तावस्थेत जातात खूप पाऊस पडला की पुन्हा जिवाणू आपल्या अवस्थेत ऍक्टिव होतात. पहीला मृगाचा पहिला पाऊस पडला की आपल्याला मातीचा वेगळाच वास येतो कारण हे जीवाणू त्यांच्या शरीरातून काही हर्मोंस श्रवतात व कार्यरत होतात. हे सर्व नैसर्गिक आहे. आपण एक उदाहरण घेऊ, समजा उन्हाळ्यात एखाद्या पिकाची लागवड केली आणि जमिनीत पाणी दिले तर असा वास येत नाही कारण जोपर्यंत नैसर्गिकरीत्या वातावरण तयार होऊन पाऊस पडत नाही तोपर्यंत या प्रकारचा वास येत नाही हा निसर्गाचा नियम आहे. आता आपण उपयुक्त जीवाणूचे फायदे कोणते ते बघूया झाड हे खत तसेचे तसे घेऊ शकत नाही त्यासाठी त्या खतावर जीवाणू मार्फत प्रक्रिया होऊन ते खत उपलब्ध स्वरूपात जिवाणू तयार करतात व ते उपलब्ध स्वरूपातील अन्न हे पीक घेतात. आपण दिलेल्या रासायनिक खतांचा वापर करायचा असेल तर आपली जमीन उपयुक्त जि...