शेती व माती ..... मिलिंद जि गोदे
मातीचे शोषण नाही तर पोषन करा! मिलिंद जि गोदे नमस्कार मित्रांनो हा लेख आपल्या शेती मातीशी निगडित आहे आपन आपल्या जमिनीत उत्पादन घेत आहोत तिचा पोत राखण्यात आपण कोठे तरी कमी पडत आहे. बेसुमार रासायनिक खते व किटक नाशकांमुळे उत्पादनात वाढ झाली खरी पण नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची आपल्या जमिनीची गरज पूर्ण होऊ शकत नाही. ज्यामुळे जमिनीचा पोत टिकण्यास मदत करणारे सेंद्रिय पदार्थ जमीनीत टाकण्याचे प्रमाण कमी झाले. जमिनीचे आरोग्य बिघडण्यास मदत झाली. सुपीक असलेल्या जमिनी आता नापीक होत गेल्या यांचे कारण काय असु शकते मित्रांनो आपल्या शेतात रासायनिक खतांच्या असंतुलीत व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृत झाल्या. खतांची कार्यक्षमताही कमी झाली. कमी कार्यक्षमतेमुळे पुन्हा वाढीव वापर आणि पुन्हा जमिनीचा ऱ्हास दृष्टचक्रात आपल्या नविन उत्पादन पध्दती मधे अडकलेल्या आहे. तिचे एक प्रकारे शोषन झालं मला शेतकर्याना हेच सांगायचे आहे की माती बाबत जागरूकता निर्माण करणारी यंत्रणा तयार व्हावी.वेळोवेळी मातीचे महत्व हे शेतकरी यांना समजावून सांगणे.जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे...