शेती मधे नविन मार्ग तयार करा.... मिलिंद जि गोदे
नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत माझ्या हा लेख वाचाल यांची मला पुर्णतः खात्री आहे. आपली शेती पुर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. आपल्या शेतकऱ्यांचे काही आर्थिक व्यवहार आपल्या शेतीतुन निघणार्या पिकावर अवलंबून असतात.आपला शेतकरी वर्ग आपआपल्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात. काही पिके भौगोलिक क्षेत्रानुसार चांगल्या प्रकारची उत्पन्न देणारी असतात तर काही पिके कमी प्रमाणात उत्पन्न देणारी असते. आणि आपला शेतकरी वर्गाला काही पिकांना खर्च जास्त करावा लागतो तर काहीना पिकांना कमी करावं लागतं. कधी कधी शेती मधे केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात खुप तफावत आढळत असल्याने शेतकऱ्यांचीआर्थिक समस्या वाढत जाते. म्हणून प्रत्येक प्रगतशील शेतकऱ्याने दूरदृष्टीचा अवलंब केला पाहिजे. केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात तफावत का येते याची माहिती समजाऊन घेतली पाहिजे व आपला शेती वर लागणारा अनावश्यक खर्च टाळणे देखील यात तेवढेच महत्वाचे आहे.आपल्याला माहिती असेल काही वेळेस शेतकऱ्यांच्या होणार्या आत्महत्येमागे केवळ कर्ज आहे म्हणून आत्महत्या केली हेच कारण नसते तर त्यामागे कौटुंबिक वाद, सामा...