माती सजिव असेल तर शेती टीकेल..!.... मिलिंद जि गोदे
नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं मि मिलिंद जि गोदे पुन्हा आपल्या सेवेत आपन शेती व माती व्यवस्थापनामध्ये तिचे आरोग्य अबाधित राखून ठेवण्या साठी किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते.आपन दरवर्षी पीक घेतल्यामुळे पिकांच्या शोषणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत जात असतो. त्यामुळे काय होते की आपल्या जमिनीची सुपिकता कमी होते. जमिनीची सुपीकता आजमावण्यासाठी भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी माती परीक्षणाची गरज ही महत्त्वाची असते. माती परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारसी ठरविणे सुलभ होते.माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी आहे. पिकांचे अस्तित्व मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्त्वाचा घटक कालांतरापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत साचण्याचे प्रमाण जास्त होते. साहजिकच जमिनीचा पोत टिकण...