शेतकऱ्या ना आता आधुनिक शेतीसाठी शिक्षण आवश्यक आहे.....!*..... मिलिंद जि गोदे

 *

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं,

शेती क्षेत्र हे मागे राहण्याचे एकमेव कारण म्हणजे न शिकलेले शेती करतात आणि शिकलेले नोकरी, शिक्षणाशिवाय शेती शक्य नाही ही एक शोकांतिका आहे.

मित्रांनो शेती सारखी दूसरी कोणतीही नोकरी नाही हे लक्षात घ्या कारण आता ती काळाची गरज आहे.

कारण कोणत्याही नोकरीला मालक असतो, येथे आपनच आपले आहे आहोत.

वर्षातले संपुर्ण दिवस आपलेच असतात आणि येथे नोकरीमध्ये फक्त रविवार आपले असतात.

नोकरीमध्ये आपण मजूर असतो कोणताही निर्णय घेणे आपल्या हातात नसते हे लक्षात घ्या.

मनुष्याला जगण्यासाठी जे अन्न लागतं ते फक्त मातीतच पिकतं, आणि त्याला पिकवणारे आहोत आपण. म्हणून शेतकऱ्याना आधुनिक शिक्षण आवश्यक आहे.

आपल्याला रोग,किडी, अन्नद्रव्याची कमतरता, ओळखता आली पाहिजे. शेतात फिरत असताना बारकाईने निरीक्षण करा.स्वतः स्वताच्या अनुभवातून एवढे शिका की, वेगळ शिक्षण घेण्याची आवश्यकता नसली पाहिजे.

ठामपणे सांगा मी शेती करतो. आपण शेती करतो, याचा अभिमान बाळगा. विश्वास ठेवा शेती क्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल.तर मग चला व्यावसायिक शेतकरी होण्यासाठी लागणारी सुत्रांचा आपण यावर्षी अंवलब करु या..!उत्तम व्यावसायिक शेतकरी व्हायचे आहे..

मग हे करा.सर्वांचे ऐकायला शिका.अनुभवाची शेती करायला शिका. उत्पादन खर्च कमी करा.

 इतरांचे अनुभव वापरताना शास्त्राचा आधार घ्या.

यशस्वी शेतकऱ्यांच्या नेहमी संपर्कात रहा.

चांगले व यशस्वी विचार देवान-घेवाणीसाठी किमान 7 दिवसातून एकदा एकत्र येवून चर्चा करा. जिथे शंका वाटेल तिथे सल्ला मसलत करा. "शेजाऱ्याने केले म्हणून" ही प्रथा बंद करा.

उपलब्ध संसाधने ओळखून त्यांचा पुरेपूर वापर करा. पुढील 8 दिवसांचे आणि हंगामाचे स्वतंत्र नियोजन बनवा.प्रत्येक वेळी मुख्य पीकात आंतरपिकाची लागवड करा सगळ्यात महत्वाचे आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी सोबत नेहमीच

संपर्कात रहा.... धन्यवाद मित्रांनो आपला मित्र मिलिंद जि गोदे milindgode111@gmail.com..... save t

he soil...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे