*नमस्कार मित्रांनो सेंद्रीय कार्बन म्हणजे काय ?* सेंद्रीय कर्ब म्हणजे पिकांच्या पानांनी म्हणजे पिकांच्या पानरूपी इंद्रीयांनी प्रकाश संश्‍लेषणच्या मध्यमातुन हवेतुन घेतलेले कार्बन होय. *सेंद्रीय कर्बाचे प्रकार पाहू* 1) उडनशील कर्ब वोलाटार्इल कार्बन 2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन 3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन *1) उडनशील कर्ब वोलाटार्इल कार्बन* कोणतेही अंतरपिक फुलोरयावर येणाच्या आधी कापून आच्छादन करतो ते आच्छादन कुजून जो कर्ब मोकळा होतो त्या कार्बनला पळपुट्टया कार्बन म्हणतात. हा कार्बन ह्युमस मध्ये कधीच जमा होत नाही व हवेत निघून जातो व वातावरणाचा तापमान वाढवतो. त्यामुळे फुलोऱ्याच्या काळात आच्छादन करू नये. 2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन कोणताही अंतरपिक फुलावर आल्यानंतर ते कापून आच्छादन केले तर त्यामध्ये अस्थिर कर्ब असतो. तो कधीच ह्युमस मध्ये जमा होत नाही पण हा कर्ब ताबडतोब मुक्त होत नाही काही वेळांनी मुक्त होतो व हवेत निघून जातो म्हणुन हा अस्थिर कर्ब आपल्या कामाचे नाही म्हणुन कोणतेही अंतरपिक फुलोरयावर कापू नये. 3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन हा स्थिर कर्बच फक्त ह्युमस मध्ये जमा होतो. ह्याच्यामुळे ह्युमस ची निर्मिती होते जेव्हा अंतरपिकांचे दाने पक्व होण्याच्या स्थीतीत असतात त्यावेळेस कर्बाची निर्मीती होते. आणी हा स्थीर कर्ब लीगनीन(काष्ठजन्य पदार्थ) व सेल्युलोज (काष्ठक जन्य पदार्थ) ह्याच्यामध्ये संग्रहीत होते. म्हणुन ह्युमस निर्माण करण्यासाठी दाणे पक्व झाल्यानंतर आच्छादन दिले पाहिजे. सेंद्रिय कर्बाचे महत्त्व : आजच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी होणे, जमिनीची धूप अधिक होणे, जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्तेत प्रतिकूल बदलासारखे अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. या सर्व प्रश्‍नावर उपाय म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा समतोल राखणे फार महत्त्वाचे आहे. माती परीक्षण अहवालाचा केलेल्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे, शेतीमध्ये सेंद्रिय द्रव्यांचा वापर कमी प्रमाणात आहे म्हणून आजच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे (0.2 ते 0.5 टक्का) त्यामुळे जमिनीचा कस कमी होणे, जमिनीची धूप अधिक होणे, जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्तेत प्रतिकूल बदलासारखे अनेक प्रश्‍न आहेत. जमिनीच्या या सर्व प्रश्‍नावर उपाय म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा समतोल राखला जाणे फार महत्त्वाचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे