नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं म्हणजे सेंद्रिय हेच नाव कसे आपल्या नैसर्गिक शेती मधे प्रचलित झाले हे पाहू
सेंद्रिय याचा अर्थ आहे, "सह इंद्रिय" म्हणजेच इंद्रियांचा वापर करून केलेली शेती हि सेंद्रिय शेती होय. इंद्रिय सजीवांना असतात, सजीव हि दोन प्रकारची असतात एक म्हणजे प्राणी व दुसरे म्हणजे वनस्पती या सर्व प्रकारच्या सजीवांना अवयव असतात. म्हणजेच प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांचा वनस्पतीचे अन्न म्हणून उपयोग करणे. त्यात खत अवस्थेत तसेच वनस्पतींवर कीड व रोग येतात म्हणजे वनस्पती आजारी पडतात, अशक्त होतात त्यांना चांगल्या अवस्थेत आणण्यासाठी या अवशेषांचा वापर करणे म्हणजे सेंद्रिय शेती करणे होय. त्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, गोमूत्र, गांडूळखत, व्हर्मिवॉश, दशपर्णी अर्क इत्यादी सजीवांच्या अवशेषांचाच हा भाग आहे. या पद्धतीने ज्या वेळी शेतीत उत्पादन वाढीसाठी उपयोग केला जाईल त्या वेळी मोठ्या प्रमाणात वातावरणात, जमिनीवर व उत्पादनावर होणारे दुष्परिणाम टाळता येतील. कारण रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांच्या सध्याच्या अति वापराने जमिनीवर, उत्पादनावर, वातावरणावर तर वाईट परिणाम होतच आहेत. सोबतच जी व्यक्ती यांची फवारणी करतात किंवा ते हाताळतात त्यांनाही याचे खूप मोठे धोके असतात. व्यवस्थित काळजी घेवून या सर्व बाबी केल्या नाहीत तर फवारणी व हाताळणी करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागताना दिसून येते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक वापरणे सर्वच दृष्टीने अपायकारक आहे व त्याचे मोठे दुष्परिणाम दिसून येतात. हे सर्व दुष्परिणाम टाळायचे असतील तर वेळीच अभ्यासक दृष्टीकोनातून सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. यासाठी आधुनिक शेतीक्रांतीला सुरुवात होणे आवश्यक आहे. ज्यामध्ये रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांना थारा नसेल व शेतीमध्ये कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत......
धन्यवाद
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा