नमस्कार मित्रहो हा लेख वाचाल व प्रतिक्रिया द्याल काही शेतकरी आहे की आपल्या शेतामधे शेणखत किंवा कंपोस्ट खत शेताने पाहीलेच नाही तरी ते त्या शेतामध्ये उत्पादन घेतात.कमी प्रमाणात का होईना पण चांगली उत्पादन घेत असतात.असे का ? त्या शेती मधे मिळणारी ही पोषण द्रव्ये कोठून मिळतात ? शेती साठी काम करणाऱ्या तज्ञांनी ही गोष्ट मान्य केली आहे त्याचे कारण त्यांना समजले व आता आपल्याला समजणे आवश्यक आहे.कारण आहे शेती ची मशागत आता विस्ताराने सांगतोय आपल्या शेतीतल्या काही मशागतीच्या पद्धतीच शेतात खतांसारखे काम करीत असतात. हे वाचुन थोडं विचित्र वाटत असेल जमिनीची मशागत हे ही एक खताचे काम करत असतो. कारण मशागतीमुळे जमिनीतल्या जिवाणूंच्या वाढीस अनुकूल स्थिती निर्माण होते आणि जिवाणूंची संख्या वाढली की, पीक चांगले येते. त्यामुळेच केवळ चांगली मशागत केली तरी चालते असे म्हटले जाते. अर्थात चांगली पिके येण्यास ही मशागत उपयोगी पडेलच असे नाही. चांगली पिके येण्यासाठी त्यापेक्षा अधिक काही तरी वेगळे केले पाहिजे. वर्षानुवर्षे खते न वापरता शेती करून उत्पन्न काढणार्‍या शेतकर्‍यांना आणखी एका गोष्टीचा उपयोग होतो. तो म्हणजे पिकांची फेरपालट. आपल्या जमिनीत आपल्या शेतीतली काही पिके जमिनीतून अन्नाची देवानं- घेवान करत असतात.काही त्यामधे काही पिकं दुसर्या पीकांचे अन्न केवळ ओढून घेणारी आहेत. तर काही पिके स्वत:ची वाढ करतात व दुसर्या पिकांना जमिनीत काही अन्न सोडून देणारी आहेत. त्यांनाच आपल्या गावरान भाषेत बिओड असे म्हणतो. पिकांची फेरपालट हे एक कारण आहे जसे नत्रयुक्त गाठी तयार होणारे पिक म्हणजे कोणतेही पीक घेतले की, मातीत राहलेले हे नत्र त्या पिकाला आपोआप उपलब्ध होते. असे नायट्रोजन सोडणारे द्विदल धान्याचे पीक एकदा घेतले की, त्यानंतर गहू, ज्वारी असे एकदल धान्य पीक घेतले जाते आणि असा फेरपालट करीत गेलो की, वर्षानुवर्षे बाहेरची कसलीही खते किंवा शेणखत न घालता शेती करत असतो.आपला बहुसंख्य शेतकरी याच पद्धतीने शेती करीत आलेले आहेत. त्यामुळे खतांवर खर्च न करता त्यांची शेती सुरू आहे. असे फेरपालट उपयोगी पडते हे खरे. पण कोणत्याही गोष्टीसाठी मर्यादा असतात. त्या मधे जास्त उत्पन्नची हमी नसते मित्रांनो. आपला शेतकरी वर्ग शेती करतो पण शेती व्यवसायचा अभ्यासाचा आधार नसतो हे गोष्ट मान्य करावीच लागेल. शेती ला जर अभ्यासाची जोड देऊ शकतो तर आपल्या शेतीतून जास्तीत जास्त किती उत्पन्न निघू शकते हे निश्चित ! आपली एक कमजोरी की आपण किती उत्पन्न काढतो व खर्च किती या गोष्टी चा कधी तुलनात्मक विचारच केलेला नाही.वाहते व्हा पेरते व्हा अशी परंपरा बंद केल्या शिवाय पर्याय नाही.जमिनीची सुपीकता त्याच बरोबर जमिन ची मशागत हा भाग पोत टिकवण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी आणि जमिनीतील जैविक क्रिया वाढवण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुलणारी सूक्ष्मजीव वनस्पती किंवा प्राणीजन्य पदार्थ जमिनीत परत घालून त्यापासून निर्माण होणारे उपयोगी सूक्ष्मजीव वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ हेच खत व्यवस्थापनाचा पाया असला पाहिजे. व्यवस्थापन प्रामुख्याने जैविक विघटनशील वनस्पती व प्राणीजन्य पदार्थ यांच्याशी निगडित असायला हवे यामुळे जमिनीची आरोग्य सेंद्रिय पदार्थ उपयुक्त सूक्ष्मजीव यांचे संतुलन साधले जाते व आपल्या उत्पादनात भर पडते..... धन्यवाद मिलिंद जि गोदे Mission agriculture soil information Agriculture development and technology group addmin milindgode111@gmail.com 9423361185

टिप्पण्या