पोस्ट्स

जिवामृत का महत्वाचे आहे.... मिलिंद जि गोदे

 नमस्कार मंडळी .... अनेकदा आपन जिवामृत चावापर आपल्या शेतात करतो.त्याचे कार्य काय आहे व वापर कसा करावा व का करावा त्यामुळे आज सर्व प्रश्नांचे उत्तर या लेखात मिळणार आहे आमच्या घरी वडिलोपार्जित जनावरें पाळली जात आहे.ती परंपरा आम्ही पुढे जपत आहे कारण गायीचे निघणारे दुध व त्यापासून दही व तुप हे सर्वात आवडते पदार्थ आहेत मी नेहमी गोमुत्र साठवुन शेतीत विविध प्रयोग करत असतो. गायीच्या शेणाचा व गोमुत्राचा वापर करुन जैविक शेतीचा प्रयोग मि माझ्या शेती वर केलेला आहे. या अनुभवातुन एक गोष्ट शिकलो एखाद्या तंत्राचे ताबडतोब फायदे मिळतात म्हणुन कोणत्याही शास्त्रीय अभ्यासा शिवाय ते तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरणे म्हणजे एक धुळफेक म्हणावं लागेल. आज युवा पिढीसमोर शेती साठीआलेले जैविक तंत्रज्ञान खरे पाहिले तर खुप जुने आहे पण हे त्यांना कोणीतरी सांगायची गरज आहे.जिवाणुंच्या वाढीसाठी बनविलेली स्लरी म्हणजे जिवामृत ! स्लरी तयार करायच्या तिसऱ्या दिवसानंतर चिलेशन होण गरजेच आहे. म्हणजे गायीच्या शेणाचे ७ दिवसांत आबंवन किंवा कम्पोस्ट करुन त्याद्वारे जैविक मॅटर व बायोमास बनविने हे खरे तंत्र आहे. याप्रक्रियेमध्ये तयार ...

नत्र चक्र....

 *निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो नत्राचे चक्र....... मिलिंद जि गोदे*  नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे आज थोडा वेगळा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या निसर्गात आढळणारी एक अद्भूत गोष्ट अशी की हवेत नत्राचे प्रमाण ७९ टक्के असूनही तो आपल्या पिकांना प्रत्यक्ष उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी वनस्पतीला सूक्ष्म जिवाणूंची मदत घ्यावी लागते. पिकांना नत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंना नत्र स्थिर करणारे जिवाणू म्हणून संबोधितात. हे जिवाणू नायट्रोजनेज नावाच्या संप्रेरकाची निर्मिती करून वायू रुपातील नत्राचे अमोनिया स्वरुपात रूपांतर करून तो पिकांना उपलब्ध करून देतात.मातीत वास्तव्य करणारे रायझोबियम व ब्रेडीरायझोबियम समूहातील नत्र स्थिर करणारे सूक्ष्म जिवाणू द्विदलवर्गीय पिकांच्या मुळांत प्रवेश गाठी निर्माण करतात. या गाठींमध्ये रायझोबियम जिवाणू सुरक्षित राहून वनस्पतीकडून अन्नरस शोषून घेतात व त्या बदल्यात नायट्रोजनेज विकराच्या सहाय्याने हवेतील मुक्त नत्र गाठीत स्थिर करतात. त्याचा पिकांना उपयोग होतो. द्विदल पिकांच्या गाठीचे अवशेष जेव्हा जमिनीत कुजतात तेव्हा...

शेती मध्ये तंत्रज्ञान गरजेचे आहे ............ मिलिंद जि गोदे...

 *शेती नविन पद्धतीने केले तर फायद्याची..... मिलिंद जि गोदे* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत वाचाल तर वाचालआजकाल शेतकरी वर्ग पिकावरील बुरशीने अतिशय त्रस्त आहे.सतत चांगली औषधे फवारणी करुन सुध्दा पिकावरील बुरशी व रोग नियंत्रणात येत नाही.पांढरी माशी, थ्रिप्स, कोळी किंवा कोणत्याही किटकांचे वाढणे हे दर्शवते कि त्यांचे पोषण करणारा रस झाडांमध्ये उपलब्ध आहे. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत चांगली औषधे पण त्याचे काही बिघडू शकत नाही.माती मधे आपन विषारी रसायनाची फवारणी केली व आपन माती मधल्या मित्र बुरशी चा नायनाट केला. परीणाम आपल्या समोरच आहे.की हरभरा वरील अकस्मात मर हे मानवनिर्मित क्रिया होय.आता थोडं विषयावर येऊ.आता प्रश्न हा आहे की झाडाच्या आतील रसाला कमी कसे करायचे खूप सोपे आहे नायट्रोजन वाढला तर रस वाढेल आणि कार्बन वाढला तर गर वाढेलच जर आपन त्या आधी जिवामृताचा वापर केला तर त्यामुळे कार्बन वाढेल आणि त्यामुळे मातीचा व इतर क्रॉप, फ्रुट, फ्लॉवर वर साइज जिवामृत मुळे झाडांमधील कार्बन चा रेशो वाढेल आणि झाडांमध्ये रस राहणार नाही तर रस शोषणारी अळी थांबणार नाही आणि जरी आली तरी...

जिवाणू खताचे महत्व..... मिलिंद जि गोदे

 *जैविक खत मातीसाठी अमृत....... मिलिंद जि गोदे* रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीची जडणघडण व गुणधर्म बदलत जाऊन जमीन खराब होते व काही कालावधीनंतर अशा जमिनीत पीक घेणे सुध्दा शक्य होत नाही. जमिनीत दिलेल्या रासायनिक खताची घातक संयुगे निर्माण होऊन जमीन ओसाड व नापीक होत जाते. यासाठी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून वनस्पतींना अन्नद्रव्ये मुक्त करून देण्यासाठी जिवाणूंची "आवश्यकता असते. जिवाणू खते रासायनिक खताच्या तुलनेने स्वस्त असतात व त्यामुळे पिकामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पीक पाण्याचा ताण सहन करू शकते, बियाण्यांची उगवण लवकर व चांगली होते. या सर्व गुणांमुळे जिवाणू खते सेंद्रिय शेतीस वरदान ठरले आहे.जिवाणू खतांसारखाच गांडुळ खताचा वापर किंवा गांडुळ खताची निर्मिती शेतीस वरदान ठरते. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहून मुळांना प्राणवायूचा भरपूर पुरवठा होतो. ह्यूमसचे प्रमाण वाढते. जमिनीचे फूल सुधारते. जमीन भुसभुशीत राहून मशागत खर्च वाचतो. जलसंधारणशक्ती वाढते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो. शेतीमालाचा दर्जा सुधारतो. वरखताची बचत होते. सूक्ष्म जिवाणू...

मातीचा कस कमी का झाला असेल..... मिलिंद जि गोदे

 *मातिची सुपिकता हा विषय आज चिंतन करण्याचा आहे......मिलिंद जि गोदे*  नमस्कार मंडळी वाचाल तर वाचाल आपन सर्वांना माहीत असेल की क शेतकर्यांची उत्पादना बाबत परीस्थिती खुप हालाकिची आहे कि दोन तीन वर्षापासून काही भागात सोयाबीन व तुर कमी होत आहे, त्या वरचे व्हायरस कंट्रोल होतच नाहीं कितीही भारी किटकनाशके,माॅलिक्युल मारा, काही फरकच पडत नाहीं, आपल्या भागातून मुग,उळीद चा विषयच संपलाच मुख हे पिक रोगामुळे जात असते तर कुठल्यातरी औषधाने ठिक झालेच असते, मुळ समस्या पिकाची नाहीं, मातीची आहे, तिचा कस सेंद्रिय कर्ब कमी झाला. बरं साधारणपणे किती कमी झाला असेल थोड़ी माहीती पाहुयात सुपिक जमिनीचा सेंद्रिय कर्ब २% घ्या आसपास असतो, आमच्या कृषी विद्यापीठ  यांच्या माहीतीनुसार तर वाळवंटात तो ०.५ % म्हणजे अर्धा टक्का असतो तर मग आपल्या जमिनीचा कर्ब कमीतकमी यापेक्षा जास्तच असायला हवा ना पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, कि एरीगेशन मधे जमिनीचा सरासरी सेंद्रिय कर्ब ०.३ % म्हणजे वाळवंटापेक्षा दुप्पटीने निकस जमीन आणि आजचा शेतकरी पिकवण्याची कसरत करत आहे भरघोस उत्पादनाची आस लावून बसलाय परिणामी कुपोषित गायच्या पोटी...

जैविक कीड नियंत्रण....... मिलिंद जि गोदे

*नैसर्गिक व जैविक कीड व रोग नियंत्रण महत्वाचे*         *........ मिलिंद जि गोदे*   पध्दती जैविक नियंत्रण पध्दतीत परोपजीवी आणि परभक्षी कीटकांद्वारे हानीकारक किडींचे नियंत्रण केल्यामुळे कोणतेही अनिष्ट परिणाम न होता हमखास कीड नियंत्रण होते. अंडीनाशक परोपजीवी कीटकामुळे पिकांचे नुकसान प्रारंभिक अवस्थेतच टळते. त्यामुळे अशा परोपजीवी कीटकांचा वापर विशेष फायदेशीर आहे. ट्रायकोग्रामा हा त्यापैकीच एक महत्वाचा परोपजीवी मित्रकीटक आहे. ट्रायकोग्रामा हा अतिशय लहान आकाराचा गांधीलमाशीच्या वर्गातील कीटक त्याची प्रौढ माशी काळसर रंगाची असते. या मित्रकीटकाची मादीमाशी इतर कीटकांची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालते. अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थेतून तिचा जीवनक्रम पूर्ण करते. कोषावस्थेपर्यंतच्या सर्व अवस्था किडीच्या अंड्यांमध्येच पूर्ण होत असल्यामुळे त्या अवस्थांची हालचाल निदर्शनास येत नाही. असून ट्रायकोग्रामा कीटक मोठ्या प्रमाणात शेतामध्ये सोडले असता हानीकारक किडींनी घातलेली अंडी शोधून त्यात अंडी घालतात. हानीकारक किडीच्या अंड्यामध्ये ट्रायकोग्रामाची अळी जगते. त्यामुळे हानीका...

सहज व शक्य शेती...... मिलिंद जि गोदे

 *“नैसर्गिक शेती म्हणजे शक्य व  सहज शेती.......मिलिंद जि गोदे* नैसर्गिक पर्यावरणात राहून निसर्गाच्या सहकार्याने करायची शेती. शेतीमधील तण हे आपले शत्रू नसून अत्यावश्यक सूक्ष्म घटक पुरवणारे मदतनीस आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आकाशाची निर्मळ विशालता, हवेची मुक्त प्राणदायिता, पाण्याची शीतलता व प्रवाहितता, प्रकाशाची तेजस्विता व अंध:कार निरसनता, भूमीची क्षमताशीलता, दानशूरता व उत्पादकता यांचा परिचय होतो. एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या सृष्टीच्या निर्मात्याबद्दल श्रध्दा व कृतज्ञता या सर्वांचा समावेश होतो. “शेतकऱ्यांचे जीवन हेच सर्वश्रेष्ठ जीवन आहे. जो आपल्या जमिनीत पैदास करून खातो, तो या देशाचा सरसेनापती बनला, प्रधानमंत्री बनला तर हिंदुस्थानचा चेहरामोहराच बदलून जाईल.परंतु या विचाराची दखल कुणी घेतली नाही. पाश्चात्य देशाची आधुनिक विज्ञानाने आमचे डोळे दिपले. आम्ही त्यांची गुलामगिरी स्वीकारली. हे मान्य करावे लागेल.त्या संस्कृतीचा पाया 'अधिकाधिक ओरबाडून घेणे' हाच होता. मातीला जड, मृत मानून सर्व रचना केली गेली. जिवंत व चैतन्याने रसरसलेल्या मातीशी सैतानी खेळ सुरू झाला. माणसाच्या ह...